पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग दरडमुक्त करण्यसाठी राज्य सरकारने वेगाने हालचाली सुरु केल्या असून १० आॅगस्टपासून द्रुतगतीवरील दुसरा टप्प्यातील रस्ता चार तास बंद ठेवण्यात येणार आहे.
नागरिकांना याची माहिती होण्यासाठी १० आॅगस्टपासून हा रस्ता बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दुपारी १२ ते ४ या वेळेत खालापूर टोलनाका ओलांडल्यानंतर वाहतूक जुन्या महामार्गावर वळविण्यात येणार आहे.