Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

दुष्काळाचा मुद्दा संपल्याने नव्या मुद्दय़ासाठी पवारांचा दौरा : खडसे

दुष्काळाचा मुद्दा संपल्याने नव्या मुद्दय़ासाठी पवारांचा दौरा : खडसे
मुंबई , बुधवार, 23 सप्टेंबर 2015 (11:01 IST)
राज्यात समाधानकारक पाऊस पडल्यामुळे दुष्काळाचा मुद्दा आता संपल्यात जमा आहे. त्यामुळे जनतेला काही दाखविण्यासाठी शरद पवार नवा मुद्दा घेऊन येतील अशी टीका राज्याचे कृषिमंत्री एकनाथ खडसे यांनी मराठवाडय़ाच्या दौर्‍यानंतर विदर्भाच्या दुष्काळी दौर्‍यावर असणार्‍या राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केली आहे.
 
राज्याचे कृषिमंत्री खडसे आज मंत्रालयात पत्रकारांशी बोलत होते त्यावेळी त्यांनी विदर्भाच्या दुष्काळी दौर्‍यावर असणार्‍या पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले. गेल्या आठवडय़ात राज्यात झालेल्या समाधानकारक पावसामुळे राज्यात असणार्‍या दुष्काळाचा मुद्दा आता जवळजवळ संपल्यात जमा आहे. त्यामुळे जनतेला काही दाखविण्यासाठी पवार नवा मुद्दा घेऊन येतील. अशा शब्दात खडसे यांनी पवार यांच्या विदर्भाच्या दौर्‍याचा समचार घेतला.
 
पावसामुळे राज्यातील चारा, पाणी व दुष्काळाचे संकट संपल्यात जमा आहे. ग्रामीण भागात पाणीपुरवठय़ासाठी सुरू केलेले टँकर्स जवळपास 70 टक्क्यांनी कमी झाले आहेत. 

Share this Story:

Follow Webdunia marathi