Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नारायण राणेंचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल

नारायण राणेंचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल
ठाणे , सोमवार, 31 ऑगस्ट 2015 (13:21 IST)
शेतकर्‍यांच्या आत्महत्येबाबत राज्य सरकारला कोणतेच गांभीर्य नाही. शेतकर्‍यांना मदतीसाठी कर्ज काढून त्यांना मदत देण्याची घोषणा करणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे थापाडेच असल्याची टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी केली.
 
चंदनवाडीत रविवारी ठाणे शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने काँग्रेस कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना राणेंनी ही टीका केली. अच्छे दिन येणार असल्याचे स्वप्न दाखवणार्‍या केंद्र आणि राज्य सरकारने सर्वसामान्यांची घोर फसवणूक केली आहे. या सर्व घडामोडींचा फायदा कार्यकर्त्यांनी घेतला पाहिजे, असे ते म्हणाले.

Share this Story:

Follow Webdunia marathi