Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बालसुधार गृहातून 21 मुलांनी काढला पळ

बालसुधार गृहातून 21 मुलांनी काढला पळ
नागपूर , सोमवार, 25 एप्रिल 2016 (11:42 IST)
पाटणकर चौक येथील बालसुधार गृहातून रविवारी रात्री 21 मुलं पळून गेल्याची घटना घडली. त्यांच्यापैकी 10 मुलं सापडली आहेत.

रविवारी रात्री जेवण झाल्यानंतर मुलांनी पळ काढला. या दरम्यान कनिष्ठ काळजी वाहक सुनिल भिलकर हा रोजंदारी कर्मचारी ड्युटीवर होता. त्याच्या डोळ्यात मिर्चीची पुड टाकून ह्या मुलांनी तेथून पळ काढला. 2013 मध्ये याच सुधारगृहातून 17 मुलं पळाली होती. या सुधारगृहात एकावेळी एकच कर्मचारी असल्यामुळे नेहमीच अशा घटना घडत असल्याचे सुधारगृहातील कर्मचार्‍यांकडून सांगण्यात येतेय.

Share this Story:

Follow Webdunia marathi