Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

महाराष्ट्रात पुन्हा गारपीटीचा इशारा ; शेतकरी धास्तावला

महाराष्ट्रात पुन्हा गारपीटीचा इशारा ; शेतकरी धास्तावला
पुणे , सोमवार, 30 मार्च 2015 (11:28 IST)
महाराष्ट्रात पुन्हा वादळी वार्‍यासह गारपीट होण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे. गेल्या महिन्यापासून सुरु असणारा अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे हतबल झालेला शेतकरी आता चांगलाच धास्तावला आहे.
 
कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे राज्यातील वातावरणात झपाट्याने बदल होत आहे. ३७ अंशावर गेलेला पारा कमालीचा खाली आला असून दिवसभर रखरखते उन्ह आणि सायंकाळी वादळी वार्‍यासह जोरदार पाऊस असे चित्र मध्य महाराष्ट्रात आहे. बदललेल्या वातावरणाचा परिणाम अजून काही दिवस जाणवणार असून येत्या दोन दिवसांत मध्यमहाराष्ट्रासह कोकणातील काही भागात वादळी वार्‍यासह गारपीट होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi