मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भेंडीची भाजी आहे,अशी सडकून टीका करत मनसेअध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपावर तोफ डागली. १०० दिवसांत भाजपाकडून कोणालाही अच्छे दिन दिसले नाहीत, अशी टीका त्यांनी केली.
डोंबिवली महापालिका निवडणुका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित सभेत बोलताना राज म्हणाले, निवडणूक तोंडावर आल्यानंतर भाजपाकडून ‘पॅकेज’ची भाषा बोलली जात आहे. पण, उमेदवारच नसल्याने भाजपाचे पॅक-अप होणार आहे.
राज यांनी सेनेवरही तोफ डागली. शिवसेना - भाजपा हे फक्त टेंडरपुरते एकत्र आले असल्याचे ते म्हणाले. शरद पवार हे जातीपातीचे राजकारण करत आहे. त्यांना मुख्यमंत्रीपदी फडवणवीस नको होते तर त्यांनी मोदींना सांगायला पाहिजे होते असेही राज म्हणाले.