Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मै परेशान...मुख्यमंत्र्यांवर एसएमएसचा भडीमार...

मै परेशान...मुख्यमंत्र्यांवर एसएमएसचा भडीमार...
कोल्हापूर , शुक्रवार, 28 नोव्हेंबर 2014 (11:06 IST)
टोलमुक्तीसाठी कोल्हापूरवासियांनी अभिनव आंदोलन हाती घेत थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांना एसएमएस पाठविण्याची मोहीम उघडल्याने मुख्यमंत्री ‘परेशान’ झाल्याची माहिती मंत्रालयातील सुत्रांनी दिली.
 
कोल्हापूरात टोलवरुन सातत्याने आंदोलन धुमसत असते. यावरुन हाणामाºयाही झालेल्या आहेत. विधानसभा निवडणुकीत दिलेल्या आश्वासनाप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी कोल्हापूरवासियांची टोलपासून मुक्ती करावी, अशी कोल्हापूरवासियांची मागणी आहे.
 
दरम्यान, ‘टोल हटवा’ असा एसएमएस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना करा, असे आवाहन संयुक्त रविवार पेठ मित्रमंडळाच्यावतीने करण्यात आला. फलकावर मुख्यमंत्र्यांचा मोबाईल नंबरही जाहीर करण्यात आला. याची माहिती मिळताच अनेकांनी मुख्यमंत्र्यांना एसएमएस पाठविण्यास सुरुवात केली.
 
मुख्यमंत्री बैठकांमध्ये व्यस्त असताना सातत्याने एसएमएसची टोन वाजू लागल्याने त्यांचे लक्ष विचलीत होत होती. कोल्हापूवासियांची मागणी रास्त असली तरी हा प्रकार चुकीचा असल्याचे मत मुख्यमंत्र्यांनी खासगीत बोलताना व्यक्त केल्याचे मंत्रालयातील सुत्रांनी सांगितले.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi