अयोध्या प्रकरणाच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर लातूरमध्ये सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली असून, पोलिसांनी शहरात जमावबंदी आदेश लागू केला आहे.
नागरिकांनी शांतता राखावी असे आवाहन पोलिस अधिक्षक सी एच स्टॅलिन व अतिरिक्त पोलिस अधिक्षक शिरिष सरदेशपांडे यांनी केले आहे.
शहरात कोणत्या प्रकरणचे वाद्य वाजवण्यास तसेच भगवा, काळा किंवा हिरवा झेंडा बाळगण्यास मनाई करण्यात आली आहे.
कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्ह्यात 8 पोलीस उप अधीक्षक, 17 पोलीस निरीक्षक, 51 पोलीस अधिकारी, 1700 पोलीस कर्मचारी, 1 प्लाटून एसआरपीएफ, 4 दंगा पथके व 800 होमगार्डसह 12 धडक कृती पथके तैनात करण्यात आल्याची माहिती पोलीस अधिक्षक स्टॅलिन यांनी दिली आहे.