Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

शेतीला अखंड 12 तास वीज

शेतीला अखंड 12 तास वीज
मुंबई- गेल्या काही दिवसांपासून राज्यतल्या बर्‍याच भागात पावसाने दडी मारल्याने पिके करपत चालली आहेत, त्यामुळे संकटात सापडलेल्या शेतकर्‍यांना कृषीपंपांसाठी पुढील तीन महिने दिवसाच्या वेळी 12 तास अखंड वीज पुरवठा करा, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.
 
पीकांना नुकसान होऊ नये यासाठी वीज पुरवठ्याचे वेळापत्रक बदलण्याच्या सूचना देण्यात आल्या. पाणी उपलब्ध आहे मात्र वेळेवर वीज मिळाली नाही तर त्याचा मोठा फटका शेतकर्‍यांना बसेल त्यामुळे दिवसाच्या वेळी वीज उपलब्ध करुन दिल्यास, पीकांना फायदा होईल. त्यामुळे नोव्हेंबरपर्यंत कृषीपंपांसाठी आठ तासांऐवजी 12 तास वीज पुरवठा तात्काळ उपलब्ध करुन द्या”, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

राहुल गांधींच्या खाटवर हल्ला, पळवापळवी