Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सत्ताधार्‍यांना क्रांतिदिनाचे झालेले विस्मरण दुर्दैवी!

सत्ताधार्‍यांना क्रांतिदिनाचे झालेले विस्मरण दुर्दैवी!
, सोमवार, 10 ऑगस्ट 2015 (11:45 IST)
क्रांतिदिनाचे सत्ताधार्‍यांना झालेले विस्मरण दुर्दैवी असल्याची टीका, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली आहे. ऑगस्ट क्रांतिदिनानिमित्त रविवारी सकाळी सत्ताधार्‍यांकडून कोणीही ऑगस्ट क्रांती मैदानावर येऊन हुतात्म्यांना अभिवादन न केले नाही. याची संधी साधत चव्हाण यांनी सत्ताधार्‍यांवर तोंडसुख घेतले. 
 
आज सत्तेत असलेल्या भाजपचे आणि त्यांची मातृसंस्था असलेल्या संघाचे स्वातंत्र्य चळवळीत काहीही योगदान नव्हते. परंतु, स्वातंत्र्य   चळवळीत बलिदान देणार्‍यांप्रती त्यांनी किमान श्रद्धा तरी बाळगायला हवी होती. 
 
राज्य सरकारच्यावतीने मुख्यमंत्री किंवा एखाद्या वरिष्ठ मंत्र्यांने येऊन स्वातंत्र्यसैनिकांना अभिवादन करायला हवे होते. हुतात्म्यांप्रती एवढे साधे सौजन्य सत्ताधार्‍यांमध्ये नसावे, हे अतिशय दुर्दैवी आहे, असे चव्हण म्हणाले. 

Share this Story:

Follow Webdunia marathi