Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यात ३७ जणांना विषबाधा

औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यात ३७ जणांना विषबाधा
, बुधवार, 28 सप्टेंबर 2022 (08:46 IST)
नवरात्रोत्सवानिमित्त खरेदी केलेल्या भगर आणि भगरीचें पिठातून विषबाधा होऊन औरंगाबादच्या लासूर स्टेशन भागातील एकाच वेळी १३ जणांना विषबाधा झाली आहे. तर तर जालना जिल्ह्यातील परतुर तालुक्यातील २४ जणांना विषबाधा झाली आहे. या घटनेने दोन्ही जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
 
मिळालेली माहिती अशी की,
औरंगाबादच्या लासूर स्टेशन येथे नवरात्रोत्सवानिमित्त भगर व भगरीचें पीठ परिसरातील विविध गावांमधील ग्रामस्थांनी खरेदी केले होते.या भगरीचे सेवन केल्यानंतर १३ ग्रामस्थांना पोट दुखणे, उलट्या, चक्कर येत असल्याने गावातील खासगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले. यावेळी विषबाधा झाल्य़ाचे लक्षात आले.
 
जालन्यात २४ जणांना विषबाधा…
औरंगाबाद प्रमाणे जालना जिल्ह्यातील परतुर तालुक्यात देखील भगर व भगरीचें पिठातून विषबाधा झाल्याचं समोर आलंय. परतुर तालुक्यातील चार गावांमधील २४ जणांना विषबाधा झाली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. यात महिलांचा सर्वाधिक समावेश आहे. तर विषबाधा झालेल्या सर्वच व्यक्तींवर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सराफा व्यापाऱ्याला लुटणाऱ्या तिघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले