Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मालवण समुद्र किनाऱ्यावर बुडून 8 जणांचा मृत्यू

मालवण समुद्र किनाऱ्यावर बुडून 8 जणांचा मृत्यू
, शनिवार, 15 एप्रिल 2017 (17:21 IST)

मालवण तालुक्यातील वायरी समुद्र किनाऱ्यावर बुडून 8 जणांचा मृत्यू झाला आहे. सकाळी 11.30 वाजता घडलेल्या या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली. बेळगावमधील मराठा मंडळ इंजिनिअरिंग कॉलेजचे 47 विद्यार्थी सहलीसाठी मालवणला आले होते. त्यातील काही जण आज सकाळी पोहण्यासाठी वायरी येथील समुद्रात उतरले. यातील 11 जण बुडाले. त्यांना वाचविण्यासाठी किनाऱ्यावरील लोकांनी आरडाओरडा केला. 11 पैकी तिघांना वाचवण्यात यश आले आहे. मृतांची नावे अशी मुजमीन अनिकेत, किरण खांडेकर, आरती चव्हाण, अवधूत, नितीन मुत्नाडकर, करुणा बेर्डे, माया कोले, प्रा. महेश.


Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

जगातील टॉप 5 चीयरगर्ल्स, ह्या दुसर्‍या पद्धतीने देखील करतात कमाई ...