Publish Date: Fri, 31 Dec 2021 (11:50 IST)
Updated Date: Fri, 31 Dec 2021 (11:52 IST)
उस्मानाबाद - लातूर - बार्शी राज्य महारमार्गावर एका भीषश अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाल्याची बातमी आहे. तर एक जण जखमी झाला आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, लातूरच्या दिशेने जात असलेल्या भरधाव कार कंटेनरला धडकून भीषण अपघात झाला आहे.
अपघातात मृत्यू झालेले चौघेही लातूर जिल्ह्यातील निवासी असल्याची माहिती समोर येत आहे. ट्रॅक्टर घेऊन जात असलेल्या कंटेनरला कारने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की कार थेट कंटेनरच्या खाली शिरली.