Publish Date: Wed, 21 Nov 2018 (08:20 IST)
Updated Date: Wed, 21 Nov 2018 (08:22 IST)
नाशिक जिल्ह्यात येवला-मनमाड मार्गावर भीषण अपघात झाला आहे. बुधवारी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास झालेल्या या दुर्घटनेत सहा जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये 3 महिला, 2 पुरुष आणि एका लहान मुलाचा समावेश आहे. मृत्युमुखी पडलेले सर्वजण एकाच कुटुंबातील असल्याची माहिती समोर आली आहे. अर्टिगा आणि आयशर या दोन गाड्यांची समोरासमोर धडक झाल्याने हा अपघात झाला आहे. अनकाई बारी जवळील ही दुर्घटना आहे.