Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सुकाणू समिती सदस्य सरकारच्या मंत्रिगटाची भेट घेणार

सुकाणू समिती सदस्य  सरकारच्या मंत्रिगटाची  भेट घेणार
, रविवार, 11 जून 2017 (10:04 IST)
  • राज्यामध्ये शेतकरी आंदोलनाच्या मागण्या मान्य न झाल्यास मध्य प्रदेशप्रमाणे आंदोलन करु, असा इशारा शेतकरी संघटनेचे नेते आणि सुकाणू समितीतील सदस्य रघुनाथ दादा पाटील यांनी दिला आहे.  तसेच सरकारची भूमिका जाणून घेण्यासाठी सुकाणू समितीतील 35 सदस्यांपैकी 15 जणांचं शिष्टमंडळ सरकारच्या मंत्रिगटाची सह्याद्री अतिथीगृहावर भेट घेतील, असं राजू शेट्टी यांनी यावेळी सांगितलंया बैठकीला प्रहार संघटनेने सर्वेसर्वा आणि सुकाणू समितीचे सदस्य बच्चू कडू हे अनुपस्थित होते. तर बैठकीकडे डॉ. गिरधर पाटील, अनिल घनवट, रामचंद्रबापू पाटील आणि डॉ. बुधाजीराव मुळीक यांनी पाठ फिरवली होती. या बैठकीनंतर पत्रकारांना माहिती देताना, राजू शेट्टी यांनी अंतिम तोडगा निघेपर्यंत आंदोलन सुरुच राहणार असं स्पष्ट केलं. दुसरीकडे रघुनाथ दादा पाटील यांनी शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास मध्य प्रदेशप्रमाणे आंदोलन करु असा इशारा यावेळी दिला. तर शेकापचे आमदार जयंत पाटील यांनी शेतकरी आंदोलनाचं केंद्र नाशिकच राहणार असल्याचं यावेळी स्पष्ट केलं.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पंढरपुर : पोहोण्यासाठी गेलेल्या 4 मुलांचा मृत्यू