Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आमचे सरकार आल्यानंतर 'ही'चौकशी करू : जयंत पाटील

आमचे सरकार आल्यानंतर 'ही'चौकशी करू : जयंत पाटील
, शुक्रवार, 1 फेब्रुवारी 2019 (09:16 IST)
सध्याचे सरकार सर्व व्यवस्था गुंडाळण्याचे काम करीत आहे. इव्हीएम मशिन हॅक होतात. ते एका नेत्याला माहीत होते आणि त्यांचा अपघात होतो, हे हॅकर स्वत: सांगत आहे. त्यामुळे गोपीनाथ मुंडे यांचा मृत्यू अपघातात झाला की ती हत्या होती, याची चौकशी आमचे सरकार आल्यानंतर केली जाईल, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले.
 
कर्जत येथे आयोजित परिवर्तन मेळाव्यात जयंत पाटील बोलत होते. जनतेला फसविणारी टोळी दिल्ली आणि मुंबईत सरकार म्हणून बसली आहे. तिजोरीत पैसा नाही आणि घोषणांचा पाऊस आहे, अशा शब्दात पाटील यांनी सरकारवर टीका केली. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

नागपूरकरांना मेट्रोसोबत ई-सायकल सुविधा