Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मनसे प्रमुख राज ठाकरेंना औरंगाबाद रॅलीपूर्वी AIMIM ने इफ्तारसाठी बोलावलं

मनसे प्रमुख राज ठाकरेंना औरंगाबाद रॅलीपूर्वी  AIMIM ने इफ्तारसाठी बोलावलं
, शनिवार, 30 एप्रिल 2022 (12:18 IST)
1 मे रोजी औरंगाबाद येथील मेळाव्याची घोषणा करणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना इफ्तार पार्टीचे निमंत्रण मिळाले आहे. ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीनने ठाकरेंना इफ्तारसाठी निमंत्रण दिल्याचे वृत्त आहे. विशेष म्हणजे मनसे प्रमुखांच्या रॅलीपूर्वी औरंगाबादमध्ये पोलिसांनी कलम 144 लागू केले होते. मात्र, त्यांना काही अटींसह रॅलीची परवानगी मिळाल्याचे वृत्त आहे.
 
इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार AIMIM औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी ठाकरे यांना इफ्तार पार्टीसाठी आमंत्रित केले आहे. शहरात शांतता आणि एकोपा प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नात त्यांनी हा निर्णय घेतला आहे. वृत्तानुसार, पुण्यात रात्रभर मुक्काम केल्यानंतर ठाकरे शनिवारी सकाळी औरंगाबादला रवाना होऊ शकतात. काही दिवसांपूर्वी मनसे प्रमुखांनी 3 मेपर्यंत मशिदींतील लाऊडस्पीकर हटवण्याचा अल्टिमेटम दिला आहे.
 
मनसेच्या एका नेत्याने सांगितले की, 'रॅली काढण्यासाठी पोलिसांनी 15 अटी घातल्या आहेत...' या मेळाव्याबाबत शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले, "त्यांनी (राज ठाकरे) किती वेळा मत बदलले हा पीएचडीचा विषय आहे."तर  भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणतात, "या रॅलीबद्दल राज्यातील लोकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे."
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

CNG Price Hike: राज्यात या शहरात सीएनजीच्या दरात वाढ