ज्येष्ठ काँग्रेस नेते, माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री बाळासाहेब विखे पाटील आणि अहमदनगर जिल्ह्याचे नेते यांचं दीर्घ आजाराने निधन झाल आहे. लोणी प्रवरामधल्या राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला तर त्यांचे वाय ८४ वर्षांचे होते.
बाळासाहेब विखे पाटील यांचं सहकार क्षेत्रामध्येफार मोठ योगदान दिले आहे. तर त्यांचे वडील पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांनी नगर जिल्ह्यातल्या लोणीमध्ये सहकारी साखर कारखाना सुरू केला होता. तर हा आशियातला पहिला साखर कारखाना होता. बाळासाहेब विखे पाटील यांनी ही सहकाराची परंपरा सुरू ठेवली होती. तर ते आयुष्यभर काँग्रेस पर्तीसोबत रहिले. त्यांनी अनेक मंत्री पदे आणि महत्वाच्या संस्थाच्या अध्यक्षपद भूषविले आहे. तर अनेक शिक्षण संस्था निर्माण करण्यात त्यांचे मोठे योगदान होते.
बाळासाहेब विखे पाटील यांच्या सामाजिक कार्याचा गौरव म्हणून २०१० मध्ये त्यांना पद्मभूषण किताबाने गौरवले आहे. तर काँग्रेस नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील हे बाळासाहेब विखे पाटील यांचा मुलगा आहेत. त्याच्या राहत्या गावी त्याच्यावर अंतिम संस्कार होणार आहेत.