Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

भाजपनं लोकशाहीला काळिमा फासली - यशोमती ठाकूर

yashomati thakur
, शनिवार, 11 जून 2022 (07:53 IST)
देशभरात राज्यसभेच्या 56 जागांसाठी 10 जुन रोजी मतदान पार पडलं. यामध्ये महाराष्ट्र, हरयाणा, राजस्थान या राज्यांचा समावेश होता. या सर्व ठिकाणी दुपारी चार वाजेपर्यंत मतदान पार पडलं. राज्यात देखील चार वाजेपर्यंत मतदान पार पडलं, त्यामुळे सायंकाळी सहा वाजेपर्यंत निकाल येणं अपेक्षित होतं. मात्र भाजपने महाविकास आघाडीच्या तीन मतांवर आक्षेप घेत आधी राज्याच्या आणि त्यानंतर राष्ट्रीय निवडणूक आयोगाकडे धाव घेतली. मात्र आयोगाने मतं अवैध ठरवण्याची मागणी फेटाळून लावली. त्यानंतर भाजपचं शिष्टमंडळ मुक्तार अब्बास नक्वी यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक आयोगाकडे धाव घेतली. भाजपने आयोगाकडे तक्रार केली. त्यामुळे या निवडणुकीत मोठा गोंधळ निर्माण झाला असून, रात्री साडेबारापर्यंत सुद्धा मतमोजणी सुरु झालेली नाही. आजवर राज्यात राज्यसभेची निवडणूक बिनविरोध करण्याची एक प्रथा होती, त्याला आता खंड पडलेला आहे. त्यामुळे ही निवडणूक ऐतिहासिक मानली गेली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

नॅशनल हेराल्ड प्रकरण: ईडीने सोनिया गांधींना पुन्हा समन्स बजावले, 23 जूनला चौकशीसाठी बोलावले