Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

दिल्लीतील महाराष्ट्र सदनासाठी तीन नवीन वाहने खरेदी केली जाणार

Maharashtra Breaking News Live in Marathi 10 May
Marathi Breaking News Live Today: दिल्लीतील महाराष्ट्र सदनासाठी तीन नवीन वाहने खरेदी केली जाणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेसाठी एका अत्याधुनिक बुलेटप्रूफ वाहनाला मंजुरी देण्यात आली आहे. महाराष्ट्रात राजकारणाशी आणि राज्याशी संबंधित प्रत्येक लहान-मोठ्या आणि ताज्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी जुळलेले रहा.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या कारला मुंबई-पुणे रस्त्यावर भरधाव वेगाने येणाऱ्या एका कारने मागून धडक दिली. मात्र, या अपघातात सर्वजण सुरक्षित आहे. सविस्तर वाचा 

ई-केवायसी आणि पडताळणीनंतर महाराष्ट्र सरकारच्या 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण' योजनेअंतर्गत ६५ लाख महिला अपात्र ठरल्या आहे. सविस्तर वाचा 

महाराष्ट्र महिला व बाल विकास विभागाने बदल्या पूर्णपणे ऑनलाइन आणि केंद्रीकृत करण्याचा निर्णय घेतला आहे. या नवीन डिजिटल प्रणालीमुळे पारदर्शकता वाढेल. सविस्तर वाचा 

महाराष्ट्रात राहणाऱ्या रिक्षाचालकांना मराठी शिकण्यासाठी १५ ऑगस्टपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. भाजप आणि शिंदे शिवसेना मराठी न बोलणाऱ्या रिक्षाचालकांना मराठी शिकवण्यासाठी विशेष कार्यक्रमांचे आयोजन करत आहे. सविस्तर वाचा 

पुण्यातील एका महिलेने पतीसोबत झालेल्या भांडणानंतर इमारतीच्या आठव्या मजल्यावरून जीवघेणी उडी घेतली. तिने काही काळ बाल्कनीचे रेलिंग धरून ठेवले होते. लोकांनी तिला वाचवण्यासाठी आरडाओरडा केला, पण पाहता पाहता तिचा हात निसटला आणि ती खाली कोसळली त्यातच तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. सविस्तर वाचा 

धाराशिव जिल्ह्यातील भूम शहरात रवींद्र हायस्कूलचा विद्यार्थी असलेल्या आदित्य नितीन जाधवने कथितरित्या आत्महत्या केली.  सविस्तर वाचा 

पाणी प्रश्नावरून इंदापूरचे शेतकरी आक्रमक झाले असून, आज १० मे पासून कार्यकारी अभियंता कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात करणार आहेत. मागण्या मान्य न झाल्यास उद्या आत्मदहनाचा इशाराही देण्यात आला आहे. अशी माहिती समोर आली आहे सविस्तर वाचा 

दिव्यांग आणि दृष्टिहीन बांधवांच्या थकीत मानधनासाठी माजी आमदार बच्चू कडू यांनी सरकारला निर्वाणीचा इशारा दिला आहे. १९ मे पर्यंत प्रश्न न सुटल्यास मंत्रालयात आंदोलन करण्याचा पवारा त्यांनी घेतला आहे. सविस्तर वाचा 

हवामान विभाग (IMD) ने आज महाराष्ट्रातील एकूण १४ जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे. राज्यात हवामानाचे दुहेरी स्वरूप दिसत आहे सविस्तर वाचा 

केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी मुंबईतील अंधेरी रेल्वे स्टेशनवर नवीन 'सब पोस्ट ऑफिस'चे उद्घाटन केले. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही उपस्थिती होती. या आधुनिक पोस्ट ऑफिसमुळे प्रवाशांना आणि स्थानिकांना टपाल सेवा अधिक सुलभ होणार आहे. सविस्तर वाचा 

नाना पटोले यांनी अशोक खरात प्रकरणात चार मंत्र्यांवर गंभीर आरोप केले आहे. पटोले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मंत्र्यांना बडतर्फ करावे अशी मागणी केली आहे. सविस्तर वाचा 
 

ठाण्यात बांधकाम वादावरून दोन गटांमध्ये रक्तरंजित संघर्ष
महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यात बांधकाम वादावरून दोन गटांमध्ये संघर्ष झाला. ही घटना कळवा येथील जयभीम नगरमध्ये गुरुवार आणि शुक्रवारच्या मध्यरात्री घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या हिंसाचारात महिलांसह दोन्ही गटांतील अंदाजे २० जण सहभागी होते. हा वाद हळूहळू वाढत गेला आणि दोन्ही गटांनी दगड आणि लोखंडी सळ्यांनी एकमेकांवर हल्ले केले. एका व्यक्तीच्या घराची तोडफोड करण्यात आली आणि त्यावर दगडफेक करण्यात आली. घराबाहेर पार्क केलेल्या एका गाडीचेही नुकसान झाले आणि त्यातील महत्त्वाची कागदपत्रे नष्ट करण्यात आली.

बाबा सिद्दीकी यांच्या अंगरक्षकाला बडतर्फ केले
बाबा सिद्दीकी यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या एका पोलीस कॉन्स्टेबलला कर्तव्यात कसूर केल्याबद्दल सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, कॉन्स्टेबल श्याम सोनावणे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नेते बाबा सिद्दीकी यांचे अंगरक्षक म्हणून तैनात होते. १२ ऑक्टोबर २०२४ च्या रात्री मुंबईतील वांद्रे पूर्व परिसरात बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. हल्लेखोरांनी हा हल्ला त्यांचे पुत्र झीशान सिद्दीकी यांच्या कार्यालयाबाहेर केला होता. या घटनेमुळे सुरक्षा व्यवस्थेबद्दल अनेक प्रश्न निर्माण झाले होते.

दिल्लीतील महाराष्ट्र सदनासाठी तीन नवीन वाहने खरेदी केली जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेसाठी एका अत्याधुनिक बुलेटप्रूफ वाहनाला मंजुरी देण्यात आली आहे. सविस्तर वाचा 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अशोक खरात प्रकरणात चार मंत्री अडकले; नाना पटोलेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्र्यांना बडतर्फ करावे अशी मागणी केली