Publish Date: Thu, 06 Mar 2025 (18:57 IST)
Updated Date: Thu, 06 Mar 2025 (19:00 IST)
Dharashiv News: काही पक्ष्यांच्या नमुन्यांमध्ये बर्ड फ्लूची पुष्टी झाल्यानंतर महाराष्ट्रातील धाराशिव प्रशासनाने ढोकी परिसरात सुमारे ३०० कोंबड्या नष्ट केल्या आहे. ढोकी येथे पाच पथकांच्या मदतीने पक्षी हत्या सुरू करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात बर्ड फ्लू पसरत आहे. नागपूर, चंद्रपूर, लातूर, वाशीम येथून बर्ड फ्लूचे अनेक नमुने आढळले. त्याचा परिणाम महाराष्ट्रातील धाराशिव जिल्ह्यात दिसू लागला आहे. धाराशिवमध्येही बर्ड फ्लूने थैमान घातले आहे. बर्ड फ्लूचे नमुने समोर आल्यानंतर जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. तसेच काही पक्ष्यांच्या नमुन्यांमध्ये बर्ड फ्लूची पुष्टी झाल्यानंतर महाराष्ट्रातील धाराशिव उस्मानाबाद प्रशासनाने ढोकी परिसरात सुमारे ३०० कोंबड्या मारल्या आहे. ज्या ठिकाणी संसर्गित पक्षी आढळले त्या ठिकाणापासून १० किमीच्या परिघात पोल्ट्री पक्ष्यांना मारले जात असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.
तसेच गेल्या महिन्यात ढोकी येथे अनेक कावळे मृत आढळल्यानंतर एव्हीयन इन्फ्लूएंझाची चिंता वाढली असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. त्यांनी सांगितले की, भोपाळ येथील आयसीएआर-नॅशनल हाय सिक्युरिटी अॅनिमल डिसीज इन्स्टिट्यूटने नमुन्यांची चाचणी केली, ज्यामध्ये बर्ड फ्लूच्या संसर्गाची पुष्टी झाली.
Edited By- Dhanashri Naik