Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कोकणातील 23 गावातल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले

, मंगळवार, 5 जुलै 2022 (15:23 IST)
कोकणात जोरदार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे कोकणातील 23 गावातल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले आहे. प्रशासनाने काय उपाययोजना केल्या आहेत याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ट्वीटद्वारे दिली आहे. हवामान खात्याने पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा दिलेला इशारा लक्षात घेता तसेच सध्या देखील पावसाचा जोर वाढल्याने पूर परिस्थिती निर्माण होऊन जीवित व मालमत्तेची हानी होऊ नये म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः कोकणातील सर्व जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या संपर्कात असून एनडीआरएफच्या  जवानांना तसेच इतर पथकांना सज्ज राहण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत.
 
विशेषत: रायगड, रत्नागिरी, ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग तसेच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये नागरिकांना पावसामुळे वाढत्या पाण्याची आणि पूर परिस्थितीची वेळीच सूचना द्यावी तसेच पूरग्रस्त भागातून स्थलांतर करावे लागल्यास योग्य ठिकाणी त्यांची व्यवस्था करावी असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मुंबईत सखल भागामध्ये पाणी साचलं, पावसाचा जोर वाढण्याची शक्यता