Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

इयत्ता दहावीच्या निकालाचे कामकाज अंतिम टप्प्यात

इयत्ता दहावीच्या निकालाचे कामकाज अंतिम टप्प्यात
, गुरूवार, 15 जुलै 2021 (09:00 IST)
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावीचा निकाल महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटवर दहावी निकालाची घोषणा होण्याची शक्यता आहे.
 
दहावीचा निकाल 15 जुलैपर्यंत लागेल अशी माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली होती. दरम्यान, शाळांकडून सुरु असलेले दहावीच्या निकालाचं काम अखेरच्या टप्प्यात आहे. तसंच विद्यार्थ्यांचे अंतर्गत गुण सिस्टीममध्ये भरण्याचे काम देखील पूर्ण होत आले आहे. शाळांकडून विद्यार्थ्यांच्या गुणांची माहिती विभागीय मंडळाकडे येणार आहे. त्यानंतर ही सर्व माहिती एकत्र करुन दहावी परीक्षेचा अंतिम निकाल तयार करण्यासाठी प्रस्ताव राज्य मंडळाकडे पाठवण्यात येणार आहे.
 
राज्यातील शाळांकडून इयत्ता दहावीच्या निकालाचे कामकाज अंतिम टप्प्यात पोहोचलं आहे. परीक्षेस बसलेल्या विद्यार्थ्यांचे अंतर्गत गुण संगणकीय प्रणालीत भरण्याचे 99 टक्के काम पूर्ण झालं आहे. शाळांकडून विद्यार्थ्यांच्या गुणांची आलेली माहिती एकत्रित करून अंतिम निकाल तयार करण्यासाठी विभागीय मंडळाकडून राज्य मंडळाकडे प्रस्ताव पाठविण्यात येतील, अशी माहिती आहे.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कोरोनाबाधितांच्या संख्येत कधी घट तर कधी वाढ सुरु