राष्ट्रवादीशी काँग्रेसची चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. काँग्रेसचा महापौरपदाचा उमेदवार निवडून येणार नाही हे तर उघड आहे. मात्र ज्याचे संख्याबळ जास्त त्याचा महापौर होणार हे नक्की त्यामुळे कॉंग्रेस भाजपला शह देण्यासाठी ही खेळी करणार आहे. महापालिकेत काँग्रेसनं उमेदवार दिला तर बहुमतासाठीचं संख्याबळ कमी होईल आणि त्याचा शिवसेनाला फायदा होण्याची शक्यता आहे.त्यामुळे आता भाजपला सत्तेत येवू द्यायचेच नाही अशी भूमिका सर्व पक्षांनी घेतली आहे.