Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

३० मे नंतर आषाढी वारी पालखी सोहळयाबाबत अंतिम निर्णय

३० मे नंतर आषाढी वारी पालखी सोहळयाबाबत अंतिम निर्णय
, शुक्रवार, 15 मे 2020 (20:40 IST)
कोरोनाची स्थिती पाहून ३० मे नंतर वारकरी संप्रदायातील मान्यवरांशी चर्चा करून देहू, आळंदी तसेच आषाढी वारी पालखी सोहळयाबाबत अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. श्री संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराजांची आषाढी पायी वारीला वारकरी संप्रदायात ऐतिहासिक महत्त्व आहे. अनेक वर्षाची या वारीला परंपरा आहे, राज्यात कोरोना संसर्गाचा वाढता धोका लक्षात घेत पुढील पंधरा दिवसातील कोरोना स्थिती पाहून पुन्हा वारकरी सांप्रदायातील मान्यवरांशी चर्चा करून व विश्वासात घेवूनच अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.
 
आळंदी ते पंढरपूर आणि देहू ते पंढरपूर पालखी प्रस्थान स्वरूप कसे असावे? याबाबत आळंदी, देहू या दोन्ही संस्थान प्रमुखांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून कोरोनाचा प्रादुर्भाव आणि त्यानुसार लॉकडाऊनचे स्वरूप पाहता श्री संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराजांची पायी वारी, पालखी सोहळयाच्या स्वरूपाबाबत निर्णय घेतला जाणार आहे. सोलापूर, सातारा आणि पंढरपूर येथील मान्यवरांची आषाढी वारी पालखी सोहळयाबाबतची मते विचारात घेतली जाणार आहेत. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

योगगुरू बाबा रामदेवकडून ई कॉमर्स पोर्टल लाँच ‘ऑर्डर मी’