Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मुख्यमंत्र्यांकडून काँग्रेस, राष्ट्रवादीला टार्गेट

मुख्यमंत्र्यांकडून काँग्रेस, राष्ट्रवादीला  टार्गेट
, शुक्रवार, 2 जून 2017 (10:26 IST)
शेतकरी संपाच्या नावे काँग्रेस-राष्ट्रवादीकडून हिंसेचा डाव केला जात असल्याचा थेट आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. पोलिसांशी संघर्ष व्हावा, गालबोट लागावं आणि संप चिघळावा यासाठी काही राजकीय नेते प्रयत्न करत असल्याचं सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस, राष्ट्रवादीला टार्गेट केलं.  गेल्या सरकारच्या तुलनेत या सरकाने शेतकऱ्यासाठी सकारात्मक काम केली आहेत. काही लोक शेतकऱ्यांना भडकवण्याचा पयत्न करत आहेत.संघर्ष यात्रेला प्रतिसाद मिळाला नाही अशी लोक शेतकऱ्यांचा भाजीपाला आणि दूध अडवत आहे असे सूचक विधान करत त्यांनी संपासासाठी विरोधकांवर टीकास्त्र सोडले आहे. शेतकऱ्यांच्या मागण्यांवर सरकार सकारात्मक असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केले. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मोर सेक्स करत नाही, म्हणून राष्ट्रीय पक्षी