Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

देवेंद्र फडणवीस यांनी टीम इंडियाला वर्ल्ड चॅम्पियन बनवल्याबद्दल केले अभिनंदन, म्हणाले-

devendra fadnavis
, रविवार, 30 जून 2024 (16:45 IST)
भारतीय संघाने T-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव करत विश्वचषक जिंकला आहे. या सामन्यात विराट कोहलीने 76 धावांची उत्कृष्ट खेळी खेळली, ज्यामुळे भारताने दक्षिण आफ्रिकेसमोर 177 धावांचे लक्ष्य ठेवले होते.
 
भारतीय संघाच्या विजयानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारतीय संघाचे अभिनंदन केले आहे. ते म्हणाले, या विश्वचषकात टीम इंडिया अपराजित राहिली आहे. सूर्यकुमार यादवने घेतलेल्या झेलने सामन्याचे चित्र फिरवले.
 
जसप्रीत बुमराहची जबरदस्त गोलंदाजी आणि विराट कोहलीची खेळी खूप खास होती. कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली संपूर्ण संघाने चमकदार कामगिरी करत भारताला क्रिकेट विश्वचषक जिंकून दिला, भारत विश्वविजेता ठरला. मी संपूर्ण टीमचे अभिनंदन करतो. हार्दिक पांड्याने भारतासाठी शेवटचे षटक टाकले, शेवटच्या षटकात 16 धावा हव्या होत्या. पण पहिल्याच चेंडूवर पांड्याने डेव्हिड मिलरची विकेट घेतली. या विकेटमध्ये सूर्यकुमार यादवची भूमिका खूप मोठी होती. सूर्याने सीमारेषेवर उडी मारून हा झेल घेतला आणि सामना भारताच्या बाजूने वळवला.असं म्हणत भारतीय संघाचे अभिनंदन केले आहे. 
 
Edited by - Priya Dixit 
 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

शिंदे सरकारने ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू केली 'तीर्थ यात्रा योजना