Publish Date: Mon, 09 Jun 2025 (15:16 IST)
Updated Date: Mon, 09 Jun 2025 (15:18 IST)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाण्यातील दिवा आणि मुंब्रा रेल्वे स्थानकांदरम्यान सकाळी ९ वाजता झालेल्या दुर्दैवी लोकल ट्रेन अपघातात मृत्युमुखी पडलेल्या लोकांबद्दल शोक व्यक्त केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे, तर ६ जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या अधिकृत हँडलवरील अलीकडील पोस्टमध्ये म्हटले आहे की, ८ प्रवासी धावत्या लोकल ट्रेनमधून पडले, ज्यामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रींनीं मृत्युमुखी पडलेल्या लोकांना श्रद्धांजली अर्पण केली आणि पीडित कुटुंबांप्रती शोक व्यक्त केला. तसेच ठाणे रेल्वे अपघाताच्या चौकशीचे आश्वासन दिले आहे.
Edited By- Dhanashri Naik