Publish Date: Wed, 06 May 2026 (10:22 IST)
Updated Date: Wed, 06 May 2026 (10:25 IST)
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्ष संघटनात्मक कामात कमी पडणाऱ्या मंत्र्यांच्या फेरबदलाचे स्पष्ट संकेत दिले आहे.
दिवाळीपूर्वी मोठे मंत्रिमंडळ फेरबदल होण्याची शक्यता आहे. जे मंत्री पक्ष संघटना मजबूत करण्यात अपयशी ठरले आहे, त्यांना मंत्रिपद सोडून संघटनात्मक जबाबदारी देऊन "डच्चू" मिळू शकतो. तसेच नव्या चेहऱ्यांना संधी देण्यावर भर देण्यात येणार आहे.
ही चर्चा जिल्हा परिषद-मनपा निवडणुकांनंतरच्या कामगिरी आढाव्यातून अधिक तीव्र झाली आहे. शिंदे यांनी "काम नाही तर पद नाही" अशा स्पष्ट इशाऱ्यासह मंत्र्यांना आणि पदाधिकाऱ्यांना सक्रिय होण्याचे आदेश दिले आहे.
महाराष्ट्रातील महायुती सरकारमध्ये हे बदल शिवसेना (शिंदे गट) च्या अंतर्गत संघटनात्मक बळकटीसाठी असल्याचे बोलले जात आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेला हा इशारा केवळ प्रशासकीय सुधारणेसाठी नसून, तो आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाची बांधणी मजबूत करण्याचा एक भाग मानला जात आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, येत्या काळात मंत्रिमंडळात मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. कामगिरीचा 'रिपोर्ट कार्ड' तयार करण्यात आला असून, ज्या मंत्र्यांविरुद्ध स्थानिक पातळीवर तक्रारी आहे किंवा ज्यांचे जनसंपर्क कमी झाले आहे, त्यांना डच्चू देऊन नव्या दमाच्या आमदारांना संधी दिली जाऊ शकते.
तसेच केवळ सरकारमध्येच नव्हे, तर पक्षातही संघटनात्मक फेरबदल केले जाणार आहे. अनेक पदाधिकाऱ्यांना कामाची गती वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे.
Edited By- Dhanashri Naik
About Writer
वेबदुनिया न्यूज टीम
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात.....
आणखी वाचा