Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

वारकऱ्यांच्या गाड्यांना टोलमाफी, सार्वजनिक बांधकाम विभागाचा निर्णय

eknath shinde
, मंगळवार, 13 जून 2023 (20:44 IST)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वारकऱ्यांसाठी खूप मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आषाढी एकादशी निमित्त वारकऱ्यांच्या गाड्यांना सार्वजनिक बांधकाम विभागाकडून टोलमाफीचा निर्णय घेण्यात आला आहे.
 
गाडी क्रमांक, चालकाचे नाव असा मजकूर नमूद करून आवश्यक त्या संख्येनुसार स्टिकर्स पुरवा, असा आदेश सरकारने परिवहन विभागाला दिला आहे. वाहतूक पोलीस आणि संबंधीत आरटीओ यांच्याशी समन्वय साधून पोलीस ठाणे आणि वाहतूक पोलीस चौक्यांमधून स्टिकर्स मिळणार आहेत. आरटीओ कार्यालयांमध्ये आजपासून स्टिकर्स उपलब्ध होणार आहेत. पंढरपूरला जातेवेळी आणि परत पंढरपूरहुन येतेवेळी वारकऱ्यांना टोलवसुलीत सवलत मिळणार आहे. वारकऱ्यांच्या वाहनांना 13 जून ते 3 जुलैपर्यंत टोलमाफी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा टोलमाफीचा निर्णय मानाच्या पालख्या, भाविक आणि वारकऱ्यांच्या हलक्या जड आणि वाहनांसाठी घेण्यात आला आहे.

Edited By- Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

एवढे लोकप्रिय आहात तर निवडणुका का टाळता?, अजित पवार यांचा सवाल