Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

माथाडी कामगारांचा शेतकरी संपाला पाठिंबा नाही

माथाडी कामगारांचा शेतकरी संपाला पाठिंबा नाही
, सोमवार, 5 जून 2017 (16:43 IST)

शेतकऱ्यांचे प्रतिनिधी नेहमीच माथाडी कामगारांवर टीका करतात, त्यामुळे माथाडी कामगार संघटनेने शेतकऱ्यांच्या संपाला पाठिंबा दिलेला नाही, असं नरेंद्र पाटील यांनी सांगितलं. महाराष्ट्र बंदची हाक देवूनही नवी मुंबईतील एपीएमसीमध्ये आवक समाधानकारक असल्याचा दावाही त्यांनी केला. एपीएमसी मार्केट बंद करण्यात नेहमीच पुढाकार घेणाऱ्या माथाडी कामगारांनी या संपात न उतरण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकरी प्रतिनिधींनी आजपर्यंत नेहमीच माथाडी कामगारांना दोष दिला, संघटनेच्या नावाने बोटे मोडली, त्यामुळे आपणही त्यांच्यापासून चार हात लांब राहिल्याचे माथाडी कामगार नेते आणि आमदार नरेंद्र पाटील यांनी स्पष्ट केले.


Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

तुम्हाला ही स्मार्ट फोनचं व्यसन सोडायच : Try This