Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

शिवसेनेत बंड झालाय का? उदयनराजे यांचा खोचक सवाल

shivsena
, शुक्रवार, 12 ऑगस्ट 2022 (15:14 IST)
भाजपा खासदार उदयराजे भोसले यांनी शिवसेनेतील बंडखोरी बोलताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गटाला टोला लगावला आहे. शिवसेनेत बंड झालाय का? असा खोचक सवाल उदयनराजेंनी केला. तसेच “शिवसेना शिवाजी महाजारांच्या नावाने स्थापन केली, मग मी म्हणायचं का शिवसेना माझी आहे” असा प्रश्न उदयनराजेंनी केला. ते  पुण्यात माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलत होते.
 
उदयनराजे म्हणाले, “शिवसेनेत बंड झाला याबाबत मला काही माहिती नाही. बंड झालाय का? शिवसेना आहेच. शिवसेना कुणाची आहे यावरून वाद सुरू आहे.शिवसेना शिवाजी महाजारांच्या नावाने स्थापन केली, मग मी म्हणायचं का शिवसेना माझी आहे. अरे वा, मग शिवसेना माझीच म्हटली पाहिजे. महाराष्ट्र माझाच म्हटला पाहिजे. काही नाही म्हणायचं.”

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कुत्र्याच्या पिल्लाला विषारी औषध देऊन मारले, गुन्हा दाखल