Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

वादळी पावसाचा तडाख्यामुळे भिंत कोसळून चार जण जखमी

, सोमवार, 6 जून 2022 (11:12 IST)
सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यात मायणी येथे अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने येथील बाजार पटांगणात जवळ असलेल्या एका घराची भिंत कोसळून चार जण जखमी झालेत. तसेच अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याची बातमी मिळत आहे. जवळपास दोन तास वाहतूक ठप्प झाली होती. अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
 
अचानक आलेल्या या वादळी पावसानं पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील नाझरे सुपे येथील शेतकरी, उत्तम कापरे यांच्या घरावरील पत्रा शेड वादळी वाऱ्यामुळे उडून गेली. एका व्यक्तीच्या घरावरील पत्रा शेड वादळी वाऱ्यामुळे उडून गेली. तर शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. संध्याकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने जोरदार हजेरी लावली. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

खेलो इंडिया युथ गेम्स हरियाणा २०२२; तिसऱ्या दिवशी ९ सुवर्ण, ४ रौप्य व २ कांस्य पदके