Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

एक लाख कर्मचारी अंगावर आले, तर काय कराल राज ठाकरे यांचा सवाल

एक लाख कर्मचारी अंगावर आले, तर काय कराल राज ठाकरे यांचा सवाल
, सोमवार, 13 डिसेंबर 2021 (14:51 IST)
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे  यांनी एसटी संपाबाबत आपली भूमिक स्पष्ट करत महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारवर  निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  यांनी एसटी संपावर अधिकृतपणे बोलायला हवे. एक लाख कर्मचारी अंगावर आले, तर काय कराल, असा रोखठोक सवाल राज ठाकरे यांनी केला आहे. नाशिक दौऱ्यावर असलेल्या राज ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 
 
चार-चार महिने पगाराशिवाय राहणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना मेस्मासारखी अरेरावाची भाषा योग्य नाही. जोपर्यंत एसटीतला भ्रष्टाचार बंद होत नाही, तोपर्यंत कर्मचाऱ्यांची परिस्थिती सुधारणार नाही. याप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी अधिकृत बोलावे. एसटीच्या संपाची माहिती घेतली आहे. एसटी कर्मचारी यावेळी युनियन सोडून एकत्र आले आहेत. लोकांसाठी राज्य असते. त्यांच्याशी अरेरावीची, कायद्याची भाषा बोलू नये. हे योग्य नाही. कर्मचाऱ्यांच्या मागण्या, प्रश्न समजावून घ्या, असे आवाहन करत खासगीकरण करण्याऐवजी एखादी मॅनेजमेंट कंपनी काढा. इकडे मात्र, तुम्ही एकही पाऊल उचल नाही. त्यांना वाऱ्यावर सोडून देऊन अरेरावाची भाषा करणे योग्य नाही. एक लाख कर्मचारी अंगावर आले, तर काय कराल, अशी थेट विचारणा राज ठाकरे यांनी यावेळी केली.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पुढील परीक्षेसाठी परीक्षार्थ्यांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही : आव्हाड