Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Wednesday, 19 February 2025
webdunia

इगतपुरी – जमिनीच्या वादातून जमावाकडून 20 वर्षीय युवतीची हत्या; तीन घरेही जाळली

murder
, शनिवार, 11 जून 2022 (15:27 IST)
तालुक्यातील अधरवड येथे जमिनीच्या वादातून जमावाकडून २० वर्षीय युवतीची हत्या करुन तीन घरे जाळण्यात आली आहे. कातकरी कुटुंबियांची ही घरे होती. हा जमाव इगतपुरी तालुक्यातील बारशिंगवे येथील असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे. शुक्रवारीच हा संतप्त जमाव कातकरी वस्तीवर चाल करून आला होता. पण, पोलिसांनी हा वाद मिटवला. पण, पहाटेच्या सुमारास कातकरी वस्तीवर जमाव आला. त्यांनी या मुलीची हत्या करुन तीन घरे जाळली. सुरुवातीला या जमावाने शरद वाघ यांना मारहाण केली. ही मारहाण सुरु असतांना त्यांची मेहुणी लक्ष्मी (20 ) ही भांडण सोडण्यासाठी आली. पण, संतप्त जमावाने तीला मारहाण केली. त्यामध्ये तिचा जागीच मृत्यू झाला. या सर्व घटनेनंतर घोटी पोलिसांनी वेगाने तपास सुरु केला आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

बाजारातील विकल्या गेलेल्या घोड्यांची यादी आमच्याकडे