Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

जालना : 22 जुलै पासून ओबीसी जनआक्रोश यात्रेला सुरवात

Maratha Vs OBC Reservation
, रविवार, 21 जुलै 2024 (13:23 IST)
सध्या राज्यात मराठा आरक्षण आणि ओबीसीला घेऊन प्रचंड तणाव आहे. मनोज जरांगे हे शनिवार पासून पुन्हा मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसले आहे. आता ओबीसी समाजाने ओबीसी आरक्षणासाठी 22 जुलै पासून जन आक्रोश यात्रेला सुरुवात करणार आहे. या यात्रेचे नेतृत्व आंदोलक लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे करणार आहे. यांच्यासह इतर ओबीसी नेते सहभागी होणार आहे. 

22 जुलै रोजी जालन्यातील दोडडगावातील मंडळ स्तम्भाला अभिवादन करून या यात्रेला सुरुवात होणार आहे. या यात्रेसाठी ओबीसी समाजाच्या बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित होण्याचे आवाहन नवनाथ वाघमारे यांनी केले आहे. 

ओबीसी आरक्षणावरून ओबीसी समाज राज्य सरकारवर संतापला असून आमचा रोष राज्यसरकार पर्यंत पोहोचावा म्हणून आम्ही ही यात्रा काढत आहो असे नवनाथ वाघमारे यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांनी सगेसोयरेंचा अध्यादेश काढता येणार नसल्याचे शब्द दिले होते. त्यांनी शब्द फिरवल्यावर पुन्हा उपोषण करण्याचा इशारा वाघमारे यांनी दिला. 
22 जुलै पासून ही आक्रोश यात्रा सुरु होऊन जालनाच्या रामगव्हाण, वडीगोद्री, बीड, अहमदनगर, परभणी, हिंगोली, बुलढाणा या जिल्ह्यातून निघेल आणि छत्रपती सम्भाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यात संपणार आहे. 
 
Edited by - Priya Dixit  

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

केदारनाथ पदयात्रा मार्गावर दरड कोसळून भीषण अपघात,तीन प्रवाशांचा मृत्यू; पाच जखमी