Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

महाराष्ट्रद्रोह तर करत नाही ना? जयंत पाटील यांनी जनतेला केले सावध

महाराष्ट्रद्रोह तर करत नाही ना? जयंत पाटील यांनी जनतेला केले सावध
, शुक्रवार, 22 मे 2020 (14:20 IST)
महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात आंदोलन करणार्‍या भाजपसोबत जावून आपण महाराष्ट्रद्रोह तर करत नाही ना? याचा विचार जनतेने करावा असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केले आहे.
 
हातात काळं घेताना एकदा तरी विचार करा, आपण अहोरात्र महाराष्ट्रासाठी झटणाऱ्या डॉक्टरांचा, पोलीस कर्मचाऱ्यांचा आणि आरोग्य सेवकांचा अपमान तर करत नाही ना! असा विचारही जनतेने मनात आणावा अशा आशयाचे ट्वीट करून जयंत पाटील यांनी भाजपाच्या आंदोलनावर जनतेला सावध केले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पुण्याच्या केमिकल फॅक्टरीत स्फोट, 5 किमीच्या परिसरात आवाज ऐकू आला