Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मुंबईत शेतकर्‍यांचा मोर्चा, रस्त्यावर 20 हजार शेतकरी

मुंबईत शेतकर्‍यांचा मोर्चा, रस्त्यावर 20 हजार शेतकरी
आपल्या मागण्यांसाठी गुरुवारी शेतकर्‍यांनी मुंबईत मोर्चा काढला. या क्रांती मोर्च्यात शेतकरी मुंबई विधानभवन समोर प्रदर्शन करणार आहेत. मोर्च्यात 20 हजाराहून अधिक शेतकरी सामील आहेत. 
 
दुष्काळ निवारण, वनाधिकार कायदा आणि स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी, आदिवासी समस्या आणि कर्जमाफी अशा मागण्यांसाठी मोर्चा काढला गेला आहे.
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागण्यांवर चर्चा करण्यासाठी आमंत्रण पाठवले आहे. फडणवीस प्रतिनिधिमंडळाशी भेट घेतील.
 
उल्लेखनीय आहे की शेतकरी आणि आदिवासींनी बुधवारपासून ठाणे ते मुंबई पर्यंत दोन दिवसीय मोर्चा सुरू केला होता. आपल्या मागण्यांसाठी शेतकर्‍यांनी बुधवारी ठाण्यात प्रदर्शन सुरू केले होते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

2028च्या ऑलिम्पिकमध्ये भारत सर्वात जास्त पदक जिंकेल : राजवर्धनसिंग राठोड