Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

महाराष्ट्र : रोज रोज मिळणाऱ्या टोमण्यांमुळे त्रस्त नवविवाहित तरुणीने केली आत्महत्या

महाराष्ट्र : रोज रोज मिळणाऱ्या टोमण्यांमुळे त्रस्त नवविवाहित तरुणीने केली आत्महत्या
, गुरूवार, 11 जुलै 2024 (14:05 IST)
कल्याणमध्ये एक नवविवाहित तरुणीने आत्महत्या केली आहे. या तरुणीने सासरच्या छळाला कंटाळून हे पाऊल उचलले आहे. मृत्यू पूर्वी या तरुणीने एक चिट्ठी लिहून ठेवली आहे. 
 
महाराष्ट्रातील कल्याणमध्ये एक वाईट बातमी घडली आहे. एक नवविवाहित तरुणीने आत्महत्या केली आहे तिने लिहून ठेवले आहे की रोजच्या टोमण्यांना कंटाळून आत्महत्या केली आहे. या तरुणीला तिचा पती आणि सासू टोमणे मारायचे. या तरुणीचे नाव जागृति बारी आहेतिचे वय २४ वर्षे आहे. या तरुणीला वारंवार तू काळी आहे, तुझ्या तोंडाचा वास येतो. घर सोडून निघून जा असे टॉर्चर करण्यात येत होते.  तरुणीने आत्महत्या केल्या नंतर तिच्या पतीने तिच्यावर अंतिम संस्कार करण्यास नकार दिला आहे. यानंतर तिच्या भावाने तीच्यावर अंतिम संस्कार केला आहे. 
 
या तरुणीचा पती मुंबई पोलिसमध्ये काँस्टेबल पदावर कार्यरत आहे. आत्महत्या करण्यापूर्वी या तरुणीने मोबाईल मध्ये एक नोट लिहून ठेवला आहे. ज्यामध्ये तिने सासूला जवाबदार ठरवले आहे. या प्रकरणामध्ये डोंबिवलीच्या मानपाडा पोलिसांनी केस दाखल करीत चौकशी सुरु केली आहे.   
 
या तरुणीच्या आईने सांगितले की शेवटचे बोलणे त्यांच्या मुलीने त्यांच्याशी केले होते तरुणीची सासू तिला पसंत करीत नाही. सासू म्हणते की तू काळी आहे. तुझे ओठ काळे आहे तुझ्या तोंडातून वास येतो. तू घर सोडून जा, नाही तर तुझ्या आई कडून दहा लाख रुपये आण. तसेच तरुणीच्या आईने सांगितले की तरुणीला शारिरीक आणि मानसिक त्रास दिला जात होता. याला कंटाळून माझ्या मुलीने हे पाऊल उचलले असे मृत तरुणीच्या आईने सांगितले आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मुंबई वर्ली हिट अँड रन केसमध्ये आरोपी मिहिर शाह याला सात दिवसांची पोलीस रिमांड