Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

महाराष्ट्र अनलॉक होणार पण शाळा-कॉलेजबाबत अद्याप निर्णय नाही - राजेश टोपे

महाराष्ट्र अनलॉक होणार पण शाळा-कॉलेजबाबत अद्याप निर्णय नाही - राजेश टोपे
, बुधवार, 11 ऑगस्ट 2021 (20:54 IST)
राज्यातील शाळा-कॉलेज सुरू करण्यास टास्क फोर्सचाच विरोध आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज (11 ऑगस्ट) पत्रकार परिषदेत दिली.
 
राज्यातील लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने उघडण्यात येत आहे. पण तरीही टास्क फोर्सने विरोध दर्शवला आहे, असं राजेश टोपे म्हणाले.
 
15 ऑगस्टपासून हॉटेल, रेस्टॉरंट, मॉल 10 वाजेपर्यंत सुरू
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत लॉकडाऊन संदर्भात घेण्यात आलेल्या निर्णयाबाबत आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सर्वांना माहिती दिली.
लोकल ट्रेनबाबत निर्णय घेण्यात आलेला आहे. दोन डोस घेऊन 14 दिवस झालेल्या नागरिकांना प्रवासाची परवानगी देण्यात येईल.
 
त्यासाठी त्यांचं ओळखपत्र आणि दोन डोस झालेलं प्रमाणपत्र दाखवल्यास मासिक किंवा त्रैमासिक पास देण्याच्या सूचना रेल्वे विभागाला देण्यात आलेल्या आहेत. या नियमाचं पालन न केल्यास त्यांच्यावर 500 रुपये दंड तसंच साथरोग कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल.
 
राजेश टोपे काय म्हणाले?
दोन डोस घेतलेल्या नागरिकांना लोकल ट्रेनने प्रवासास परवानगी
हॉटेल, रेस्टॉरंट, मॉल 10 वाजेपर्यंत सुरू
मॉलमध्ये केवळ 2 डोस घेतलेल्या नागरिकांना प्रवेश
सरकारी, खासगी कर्मचाऱ्यांचं प्राधान्यांने लसीकरण
खासगी कार्यालये 24 तास चालू राहू शकतील
कर्मचाऱ्यांचे दोन डोस झालेल्या आस्थापना पूर्ण क्षमतेने सुरू करता येतील.
सर्व प्रकारची दुकाने 10 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी.
पुढील आदेश येईपर्यंत सिनेमा, नाट्यगृह, मल्टीप्लेक्स बंदच
इनडोअर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स सुरू करण्यास मान्यता
तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या ऑक्सिजन क्षमतेत वाढ करण्याची सूचना
'डेल्टा प्लस' व्हेरियंटमुळे महाराष्ट्रात निर्बंध लागणार नाहीत'
'डेल्टा प्लस' व्हेरियंटमुळे महाराष्ट्रात कोणतेही निर्बंध लागणार नाहीत, असं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं आहे.
 
जालना येथे 24 जून रोजी माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले, "'डेल्टा प्लस' व्हेरियंटचे आजपर्यंत 21 रुग्ण आढळले आहेत. याचे मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळलेले नाहीत. रुग्णांचा शोध मात्र प्रशासन घेत आहे. संपूर्ण 36 जिल्ह्यात महिन्याला 100 सॅम्पल घेत आहोत, त्याचा बारकाईनं अभ्यास करत आहोत. या 21 रुग्णांपैकी 80 वर्षांचा एक रुग्ण ज्याला सहव्याधी होत्या, त्याचा दुर्दैवानं मृत्यू झाला आहे. बाकीचे पेशंट स्थिर आहेत, बरेचसे पेशंट बरे होऊन घरीसुद्धा गेलेत.
 
"त्यामुळे घाबरण्यासारखा विषय अजिबात नाहीये. कोणतेही निर्बंध लावण्याचं सध्या काही कारण नाही. सध्या कोव्हिडच्या अनुषांगिक वर्तणूक आपण पाळली, तर अडचणीचा कुठलाही विषय राहणार नाही."
 
दरम्यान, राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारी (23 जून) झालेल्या बैठकीत डेल्टा प्लस व्हेरियंटमुळे राज्यात निर्बंध लावावेत का, याबद्दल चर्चा झाली.
तिसऱ्या लाटेबद्दल केंद्र आणि राज्य सरकार सातत्यानं बोलत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अद्याप अधिक संसर्ग असणाऱ्या जिल्ह्यांच्या जिल्ह्याधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यातही त्यांनी घाईघाईनं निर्बंध शिथिल करुन नका असं जिल्ह्याधिकाऱ्यांना सांगितलं. नव्या लाटेचा धोका लक्षात घेता सरकारनं अधिक निर्बंधांची तयारी सुरु केली आहे, असंही या सल्ल्याकडे पाहिलं जातं आहे.
 
बाजारपेठांमध्ये होणारी गर्दी चिंतेची बाब आणि 'डेल्टा प्लस'चे रुग्ण
दोन आठवड्यांपूर्वी राज्य सरकारनं राज्यभरात निर्बंध शिथिल करणं सुरु केलं. पाच विविध स्तरांमध्ये जिल्ह्यांची विभागणी केली आणि जिथं चिंताजनक रुग्णवाढ आहे ते जिल्हे वगळता अन्य सर्वत्र नेहमीच्या व्यवहारांसाठी मोकळीक दिली. पण त्यानंतरही रुग्णवाढ मर्यादेत राहिली होती.
 
पण निर्बंध हटवल्यामुळे सर्वत्र गर्दी पाहायला मिळते आहे. विशेषत: बाजारपेठांमध्ये होणारी गर्दी चिंतेची बाब बनली आहे. अनेक पर्यटन स्थळांवरही गर्दी पहायला मिळाली. गेला आठवडाभर राज्यातली रुग्णसंख्या कमी होतांना पाहायला मिळाली, पण ती बुधवारी पुन्हा दहा हजारांच्या पार गेली.
त्याशिवाय म्युटेशन होऊन देशातल्या अन्य भागांमध्ये आढळायला लागलेल्या कोरोना विषाणूच्या नवीन 'डेल्टा प्लस' या नव्या रुपाचा प्रादुर्भाव महाराष्ट्रातही पाहायला मिळतो आहे. तो आकड्यांमध्ये सध्या कमी वाटतो आहे, पण त्याच्या परिणामकारकतेविषयी अद्याप पूर्ण संशोधन झाले नाहीय. महाराष्ट्रात या विषाणूच्या रुपाचे 21 तर देशभरात 40 रुग्ण आहेत हा आतापर्यंतचा अधिकृत आकडा आहे.
 
त्याच्या पार्श्वभूमीवरच निर्बंध अधिक कठोर करण्याचं सरकारचं मत बनलं आहे. त्यामुळेच मंत्रिमंडळाच्या बैठकीत अशी चर्चा झाली. नाव न घेण्याच्य अटीवर एका वरिष्ठ मंत्र्यांनी निर्बंध कडक करण्याबद्दल चर्चा झाल्याचं 'बीबीसी मराठी'ला सांगितलं होतं.
 
घाईघाईनं निर्बंध शिथिल करु नका : मुख्यमंत्री
नुकचेत शिथिल केलेले निर्बंध पुन्हा कठोर करण्याची शक्यता असतांना आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अधिक संसर्गाचं प्रमाण असणाऱ्या जिल्ह्यांना घाईघाईनं निर्बंध शिथिल करु नका असं सांगितलं आहे.
 
"दुसऱ्या लाटेचं शेपूट अद्याप बाकी आहे. आपण त्यातून पूर्णपणे बाहेर आलेलो नाही. जिल्ह्यांसाठी विविध निर्बंधांच्या पातळ्या ठरवल्या असल्या तरीही स्थानिक प्रशासनानं प्रत्यक्ष परिस्थिती पाहून आणि कोणताही धोका न पत्करता निर्बंधांबाबतीत निर्णय घ्यायचा आहे. स्तरांचा आधार घेऊन नागरिक मुक्तपणे आरोग्याचे नियम न पाळता सर्व व्यवहार करणार असतील आणि गर्दी करणार असतील, तर संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढून परिस्थिती बिघडू शकते," असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
त्यामुळेच न ओसरलेल्या दुसऱ्या लाटेबद्दल आणि शिथिल निर्बंधांबद्दल राज्य सरकार अद्यापही साशंक आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Share this Story:

वेबदुनिया वर वाचा

मराठी ज्योतिष लाईफस्टाईल बॉलीवूड मराठी बातम्या

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Gold price today : सोनं-चांदी किमतीत घसरण