Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

राज्यमंत्री बच्चू कडू यांच्याकडून मोदी सरकारला इशारा

राज्यमंत्री बच्चू कडू यांच्याकडून मोदी सरकारला इशारा
, मंगळवार, 1 डिसेंबर 2020 (12:25 IST)
केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात हजारो शेतकरी आक्रमक झाले आहेत. पंजाब, हरयाणातून हजारो शेतकरी दिल्लीच्या वेशीवर पोहोचले आहेत. सुरक्षा दलांनी त्यांना रोखून धरलं आहे. शेतकरी आणि पोलिसांमध्ये अनेकदा चकमक घडली आहे. शेतकऱ्यांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रूधुराचा, पाण्याच्या फवाऱ्यांचा वापर केला जात आहे. यावरून विरोधकांनी मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. 
 
राज्यमंत्री बच्चू कडूंनी मोदी सरकारला थेट इशारा दिला आहे. केंद्र सरकारने सर्व शेतकऱ्यांना सन्मानाने दिल्लीत येऊ द्यावं व त्यांच्याशी प्रामाणिकपणे संवाद करावा. ३ दिवसात तोडगा निघाला नाहीतर, या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मी स्वतः महाराष्ट्रातील हजारो शेतकऱ्यांसोबत दुचाकी घेऊन दिल्लीत डेरा आंदोलन करेन, असा इशारा कडूंनी दिला आहे.  

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सोन्यातील 4 वर्षांची सर्वात मोठी मासिक घट, जाणून घ्या किंमती का कमी होत आहेत?