Publish Date: Sun, 07 Aug 2022 (10:34 IST)
Updated Date: Sun, 07 Aug 2022 (10:36 IST)
शिंदे गटाला विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही. ही घटनेतील तरतूद आहे. कुणीही साधी घटना वाचली, तरी त्यांना कळेल. दोन तृतीयांश सदस्यांनी कुठल्यातरी पक्षामध्ये विलीन झाले पाहिजे. पण, महाराष्ट्रात असं काही घडलेलं नाही, असं विधान काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं आहे.
एकनाथ शिंदे गटातील आमदारांच्या अपात्रतेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. या आमदारांवर निलंबनाची टांगती तलवार असल्याचं विरोधकांकडून वारंवार सांगितलं जात आहे.
याबद्दलच बोलताना पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं की, दहाव्या परिशिष्टाप्रमाणे पक्षांतर बंदी कायद्याची तरतूद घटनेत आहे. त्याचं उल्लंघन झालं आहे. त्यामुळं शिंदे गटातील सर्व आमदार निलंबनाला पात्र आहेत.