Publish Date: Mon, 17 Jul 2017 (10:03 IST)
Updated Date: Mon, 17 Jul 2017 (10:05 IST)
कर्जमाफी हा मोठा विषय आहे. त्यात सरकार आर्थिक अडचणीत आहे.हे आम्ही मान्य केले तर आम्ही यावर पर्याय देखील सुचवतो आहोत. मुंबई महापालीकेच्या सुमारे ६० हजार कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. त्यामुळे महापलिकेने या ठेवी सरकारला द्याव्यात बदल्यात किती व्याज हवे ते सांगावे त्यामुळे मोठा प्रश्न मिटेल, शिवसेना सर्वत्र सत्तेत आहेत. शिवसेने कडे महापालिका आहे.त्यांनी हा निर्णय घ्यावा असले अजित पवार म्हणाले आहेत. यामुळे आता नवीन वाद निर्माण होणार आहे. अजित पवार यांनी शिवसेनेवर जबर टीका केली आहे.