Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मुंबई विमानतळावर अपघात टळला, हवाई दलाचं विमान रनवेहून पुढे निघाला

मुंबई विमानतळावर अपघात टळला, हवाई दलाचं विमान रनवेहून पुढे निघाला
, बुधवार, 8 मे 2019 (12:48 IST)
मुंबई: हवाई दलाचं एएन-32 विमान मुंबई विमानतळावर उड्डाण घेत असताना रनवेहून पुढे निघून गेला. विमान बंगळुरुला जाण्यासाठी उड्डाण करत होतं. त्यावेळी धावपट्टीवरुन ठराविक अंतर कापल्यानंतरही विमानानं उड्डाण केलं नाही. यामध्ये कोणालाही इजा झालेली नाही. एअरफोर्स अधिकारी याचे कारण तपासत आहे.
 
माहितीनुसार मंगळवारी रात्री 11 वाजून 39 मिनिटावर हवाई दलाचं एएन-32 विमान धावपट्टी क्रमांक-27 वर ओव्हररन झाला. 
 
विमानतळावरील 27 व्या क्रमांकाची धावपट्टीवरुन नागरी विमानांची उड्डाणं होत नाहीत. त्यावेळी त्या भागात कोणीही नव्हतं. यामुळे अपघात टळला. मात्र यामुळे इतर विमानांच्या वेळापत्रकावर परिणाम झाला. काही विमानांच्या वेळा बदलण्यात आल्या. तर काहींची उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

तेज बहादूर यादव यांच्या याचिकेची उद्यापर्यंत तपासणी... कोण आहेत तेजबहादूर?