Publish Date: Sat, 14 Jan 2017 (10:56 IST)
Updated Date: Sat, 14 Jan 2017 (10:59 IST)
आज निवडणुका झाल्या तर भाजपमुक्त भारत आणि महाराष्ट्र होईल, असा दावा काग्रेसँचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी केला आहे. काँग्रेसमुक्त महाराष्ट्रासाठी युती हवी, असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल केलं होतं. मुख्यमंत्र्यांच्या याच वक्तव्याचा नारायण राणे यांनी टीका केली आहे. ते म्हणाले की 2014च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान काँग्रेसमुक्त देश करण्याची भाषा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती, पण ते काहीही झालेलं नाही. आज निवडणूक झाली तर भाजपची राज्यातली सत्ता जाऊ शकते, असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.खादी ग्रामोद्योगाच्या यंदांच्या वर्षीच्या कॅलेंडरवर महात्मा गांधींऐवजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो लावल्याचाही त्यांनी जोरदार टीका केली आहे.11 लाखांचा सूट घालणार aआमत्र कधीही गांधी यांनी जशी खादी घातली तसे खादी घालत नाही, असा सणसणीत टोला राणे यांनी मारला आहे. त्यांनी भाजपा वर मोठय प्रमाणात टीका केली आहे.