Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Monday, 17 March 2025
webdunia

Ladki Bahin Yojana आता जयंत पाटील बहिणींसाठी लढणार, मुख्यमंत्री फडणवीस यांनी सर्वांसमोर दिले आश्वासन

ladaki bahin yojna
, गुरूवार, 13 फेब्रुवारी 2025 (08:46 IST)
Ladki Bahin Yojana News : महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेतून अनेक महिलांना वगळण्यात आल्याच्या बातम्या आल्या आहे. जयंत पाटील यांनी याला महिलांवरील अन्याय म्हटले आहे आणि त्याविरुद्ध लढण्याचा निर्णय घेतला आहे.तर मुख्यमंत्र्यांनीही आपले आश्वासन दिले.
मिळालेल्या माहितीनुसार लाडकी बहीण योजनेमुळे महाराष्ट्र सरकारला इतर योजना राबविण्यात अडचणी येत आहे. म्हणून, लाभार्थी महिलांची संख्या कमी करण्यासाठी, सरकार महिलांच्या पात्रतेची पुनर्तपासणी करत आहे. महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सध्या अशा प्रकारच्या अटकळी चर्चेचा विषय बनत आहे. महायुती सरकारची महत्त्वाकांक्षी योजना 'लाडकी बहीण योजना' महापालिका निवडणुकीनंतर बंद होईल, असा दावाही केला जात आहे. पण या अटकळींमध्ये, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लाडक्या बहिणींसाठी लढण्याची घोषणा केली आहे. पाटील यांनी सरकारला आव्हान देत म्हटले आहे की, योजनेच्या नावाखाली तुम्ही बहिणींची मते घेतली. तर आता मला पाहायचे आहे की तुम्ही योजना बंद कशी करतात?
या योजनेमुळे सरकारवरील आर्थिक भार वाढला आहे. वित्त विभागासोबतच कॅगनेही राज्य सरकारला इशारा दिला आहे. त्यामुळे ही योजना बंद होण्याचे अंदाज वर्तवण्यास सुरुवात झाली आहे. परंतु जयंत पाटील यांनी या योजनेचे फायदे न थांबवण्याचा इशारा दिला आहे. जर सरकारने ही योजना थांबवली तर आम्ही पक्ष संघटनेच्या माध्यमातून तालुका पातळीवर लढू आणि लाडक्या बहिणींना दिले जाणारे पैसे थांबू देणार नाही, असे पाटील यांनी म्हटले आहे. कारण तुम्ही त्यांना वचन दिले आहे आणि त्यांनी तुम्हाला त्यांचे मत दिले आहे.
 
‘लाडकी बहीण’ योजना बंद केली जाणार नाही- मुख्यमंत्री
विरोधकांकडून पसरवल्या जाणाऱ्या 'लाडकी बहीण' योजना बंद पडण्याच्या अफवांमध्ये, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठे विधान केले आहे. ‘रसिकाश्रय’ या संस्थेच्या उपक्रमाअंतर्गत, यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी भागातील २० महिला, ज्या दुसऱ्यांच्या घरात घरकाम करून उदरनिर्वाह करतात, त्यांनी बुधवारी दक्षिण मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी महिलांनी अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी सांगितले की, आमच्यासमोरील समस्या अशी होती की घरकाम करून मिळणाऱ्या ५०० रुपयांत आम्ही आमचे घर कसे चालवू शकतो? म्हणून लाडकी बहीण योजना ही आमच्यासाठी केवळ आर्थिक मदत नाही तर ती आमच्या उपजीविकेचा आधार आहे. त्यांचे हे शब्द ऐकून मुख्यमंत्र्यांचे डोळे भरून आले. त्यांनी वचन दिले की ही योजना कधीही थांबणार नाही!

Edited By- Dhanashri Naik 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

ठाकरे गटाला मोठा धक्का, शिवसेना युबीटीचे माजी आमदार यांनी पक्षाच्या उपनेतेपदाचा राजीनामा दिला