Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

केसीआर मुंबई दौऱ्यावर, उद्धव ठाकरे मंत्रिमंडळाची भेट घेतली

केसीआर मुंबई दौऱ्यावर, उद्धव ठाकरे मंत्रिमंडळाची भेट घेतली
, रविवार, 20 फेब्रुवारी 2022 (17:09 IST)
फोटो साभार -सोशल मीडिया(ट्विटर)
"तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्याशी आज भेट झाली. देशातलं वातावरण गढूळ होत चाललं आहे. सूडाचं राजकारण खालच्या पातळीवर गेलं आहे. बदला घेण्याचं हिंदुत्व आमचं नाही", असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. दोन्ही नेत्यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधला.
 
मुख्यमंत्री म्हणाले, "छत्रपती शिवाजी महाराजांची काल जयंती होती. आमची आज भेट होतेय. आतमध्ये एक, बाहेर वेगळं असं आम्ही करत नाही. बैठकीत लपवण्यासारखं काहीही नाही.
 
देशाचं भवितव्य काय? देशाचा विचार करायला पाहिजे होता. आज नव्याने साक्षात्कार झालेला नाही. संपूर्ण देशात राज्यं शेजारधर्म विसरली आहेत. आम्ही सख्खे शेजारी आहोत. राज्याराज्यात चांगलं वातावरण राहायला हवं. राज्य गेलं खड्यात, देश गेला खड्यात हे परवडणारं नाही. आकार उकार यायला थोडा वेळ लागेल. देशाचे मूलभूत प्रश्नांऐवजी, दुसऱ्याला बदनाम करण्याची व्यवस्था तयार झाली पाहिजे. आम्ही दोघांनी एक दिशा ठरवली आहे. आम्ही त्यानुसार वाटचाल करू".
 
"देशात अन्य काही लोक आहेत जे आमच्याप्रमाणे विचार करतात. काही दिवसातच हैदराबाद इथे पुन्हा चर्चा होईल. मग पुढचा रस्ता स्पष्ट होईल", असं तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव म्हणाले.
 
ते पुढे म्हणाले, "महाराष्ट्र-तेलंगणा भाऊ-भाऊ आहेत. 1000 किलोमीटरची सीमा लागून आहे. महाराष्ट्र आमचा मित्र आहे. अनेक गोष्टींमध्ये सहकार्याने काम करावं लागतं. दोन नेते भेटतात त्यावेळी देशाच्या राजकारणासंदर्भात चर्चा होते. देशात परिवर्तनाची गरज आहे. देशातल्या युवा मंडळींना घेऊन काम करायला हवं. देशाचं वातावरण खराब करायला नको. भारताला मजबूत करावं अशी आमची इच्छा आहे. अन्य पक्षांच्या नेत्यांशीही चर्चा करू. लोकशाहीसाठी लढायचं आहे. आमच्या भेटीत जी चर्चा झाली त्याचे सकारात्मक परिणाम. उद्धवजींना हैदराबादचं निमंत्रण देतो. त्यांनी आमचं छान आदरातिथ्य केलं".
 
केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर केला जात आहे. आम्ही याचा निषेध करतो. केंद्राला याचे परिणाम भोगावे लागतील असंही ते म्हणाले.
 
उद्धव ठाकरे यांच्या शासकीय निवासस्थानी, 'वर्षा' बंगल्यावर ही भेट पार पडत असून चंद्रशेखर राव यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी उद्धव ठाकरेंसोबत संजय राऊत, एकनाथ शिंदे, सुभाष देसाई आणि अरविंद सावंत उपस्थित आहेत.
 
तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची मुंबईत भेट घेतली.केसीआर यांच्यासोबत त्यांची मुलगी आणि एमएलसी के कविता आणि पक्षाचे खासदार जे संतोष कुमार, रणजित रेड्डी आणि बी बी पाटील हे मुंबई दौऱ्यावर होते.तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी ठाकरे यांची भेट घेतली आणि त्यांच्यासोबत जेवण केले. केसीआर आणि ठाकरे एका बागेत बसल्याचे चित्र दिसत आहे. सोबत शिवसेनाप्रमुखांचा धाकटा मुलगा तेजस ठाकरेही दिसत आहे. राव यांच्यासह ठाकरे तेलंगणा राष्ट्र समितीच्या नेत्यांना अभिवादन करताना व्हिडिओ क्लिपमध्ये दिसत आहे. शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊतही क्लिपमध्ये दिसत आहेत. 
 
भाजपविरोधी भूमिकेसाठी ओळखले जाणारे अभिनेते-राजकारणी प्रकाश राजही या बैठकीत दिसले. तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाने सांगितले की राव यांना ठाकरे यांनी त्यांच्या घरी जेवणासाठी आमंत्रित केले होते. त्यानंतर ते राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचीही भेट घेणार आहेत. तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांचे स्वागत करणारे पोस्टर्स मुंबईत ठिकठिकाणी लावण्यात आले आहेत. पोस्टर्सवर राव, ठाकरे, पवार आणि शिवसेना संस्थापक बाळ ठाकरे यांची छायाचित्रे आहेत.
 
तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी मुंबईत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि इतर नेत्यांची भेट घेतल्यानंतर सांगितले की, "आमच्या बैठकीचा चांगला परिणाम तुम्हाला लवकरच दिसेल. मी उद्धवजींना तेलंगणात येण्याचे निमंत्रण देतो." चंद्रशेखर राव म्हणाले, "केंद्रीय यंत्रणांचा अत्यंत चुकीच्या पद्धतीने गैरवापर होत आहे, आम्ही त्याचा निषेध करतो. केंद्र सरकारने आपले धोरण बदलावे, अन्यथा त्यांना त्रास होईल. अशा अनेक गोष्टी देशाने पाहिल्या आहेत."

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

युक्रेनच्या पूर्वेकडील भागात अनेक स्फोटांचे आवाज ऐकू आले, कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही