Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

एकीकडे महिलांच्या सन्मानाविषयी बोलायचं आणि दोन दिवसांनी, शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली

sharad pawar
, बुधवार, 24 ऑगस्ट 2022 (08:55 IST)
शरद पवार यांनी गुजरातमधील बिल्किस बानो सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोषींना सोडून देण्याच्या निर्णयावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली आहे. “एकीकडे महिलांच्या सन्मानाविषयी बोलायचं आणि दोन दिवसांनी गुजरात सरकार एका महिलेवर बलात्कार करणाऱ्यांना सोडून देतं. हाच महिलांचा सन्मान आहे का?” असा प्रश्न शरद पवारांनी विचारला आहे. ते मंगळवारी दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलत होते.
 
शरद पवार म्हणाले, “सर्वांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं १५ ऑगस्टचं भाषण ऐकलं. त्यात ते महिलांविषयी खूप चांगलं बोलले, महिलांच्या सन्मानाविषयी बोलले. एकीकडे महिलांच्या सन्मानाविषयी बोलायचं आणि दोन दिवसांनी गुजरात सरकार एका महिलेवर बलात्कार करणाऱ्यांना सोडून देतं. बिल्किस बानोंवर कसे आणि किती अत्याचार झाले हे सर्वांना माहिती आहे.”

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कोजागिरी, मंगळागौर, अगदी लग्नालाही खेळाचा दर्जा दिला पाहिजे राज ठाकरें यांनी मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा साधला