Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आता सरपंचही थेट जनतेमधून निवडण्याचा प्रस्ताव : पंकजा मुंडे

आता सरपंचही थेट जनतेमधून निवडण्याचा प्रस्ताव : पंकजा मुंडे
, गुरूवार, 27 एप्रिल 2017 (20:50 IST)

नगराध्यक्षांप्रमाणे आता सरपंचही थेट जनतेमधून निवडण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली आहे. येत्या सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात राज्यभरातल्या 8 हजार ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत. त्यावेळी या निर्णयाची अंमलबाजवणी करण्याचा प्रयत्न असणार आहे. यात उपसरपंचांची निवड मात्र ग्रामपंचायतीच्या सदस्यांमधून केली जाईल. तीन चतुर्थांश बहुमतानेच सरपंचांविरुद्ध अविश्वास ठराव मंजूर होऊ शकेल, असा प्रस्ताव आहे. राज्य मंत्रिमंडळाची येत्या एक महिन्यात सदर प्रस्तावाला मंजुरी मिळवली जाईल आणि विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात त्या संबंधीचे विधेयक पारित करुन सप्टेंबर-ऑक्टोबरमधील निवडणुकीपासून त्याची अंमलबजावणी करण्याचा राज्य सरकारचा विचार आहे. 

 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

भगवा दहशतवाद हा काँग्रेसने रचलेला कट : साध्वी प्रज्ञा सिंह