Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

गैरसमज दूर करण्यासाठी निवडणूक लढवणारच

गैरसमज दूर करण्यासाठी निवडणूक लढवणारच
, शुक्रवार, 16 जून 2017 (10:23 IST)
स्वर्ग आता केवळ दोन बोटेच राहिला आहे, असा समज काहींचा झाला असून अशा लोकांचा हा गैरसमज दूर करण्यासाठी आपण आगामी निवडणूक लढवणारच असल्याची घोषणा माजी मंत्री आमदार डॉ. पतंगराव कदम यांनी केली. डॉ. कदम सांगलीत पत्रकारांशी बोलत होते. डॉ. कदम यांचा हा रोष भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख व जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांच्या दिशेने होता. दरम्यान कर्जमाफीबाबत विरोधकांशीही चर्चा करण्याचे भाजपचे धोरण लोकशाहीत नक्कीच समाधानकारक आहे असेही डॉ. कदम यांनी यावेळी सांगितले. 
 
सध्या वाढत चाललेली भाजपची ताकद व पलुस कडेगाव मतदार संघातील पारंपरिक विरोधक देशमुख बंधू यांचे वाढते प्राबल्य यामुळे आगामी निवडणूक कदम कुटुबियांपैकी अन्य कोणी लढवली तर विरोधकांना ही निवडणूक सोपी जाईल अशी चर्चा सुरू आहे.  याबाबत बोलताना डॉ. कदम म्हणाले, आतापर्यंत अनेक उन्हाळे पावसाळे पाहीले आहेत. अनेक वादळं आली व गेली. सध्याची परिस्थिती पाहता आगामी निवडणूक मला लढवावीच लागेल. लोकसभा की विधानसभा हे मात्र ज्या त्या वेळी ठरवू असे स्पष्ट केले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

चॅम्पियन्स ट्रॉफी: बांग्लादेशचा पराभव, रविवारी भारत-पाक भिडणार